.
.
.
.
.
.
.
.
.
.
राज ठाकरे मातोश्रीत....
.
.
.
खरा पोकेमॉन बारामतीत लपला असल्याचे मातोश्रीवरुन स्पष्ट ....”
व्यापम ....देर आये ,दुरुस्त आये.
व्यावसायिक परिक्षा मंडल (व्यापम ),मध्य प्रदेश चा घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा ठरु पहातोय.वैद्यकिय ,अभियांत्रिकी च्या अभ्यासक्रमासाठी ची प्रवेश परिक्षेची जबाबदारी या मंडळावर होती ईथवर सर्व ठीक होते.परंतु ,राज्यशासनाचे प्रशासकीय अधिकारी नेमण्याची जबाबदारी हि व्यापम वर टाकुन भ्रष्टाचार्याना जणु चराउ कुरणच खुले करुन दिले.
आणि येथुनच घोटाळा बाहेर येउ लागला.परिक्षेला तोतया विद्यार्थी बसवणे ,लाच घेउन अधिकारी भरती करणे,पात्रता नसताना चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवुन देणे असे 1ना अनेक प्रकार हळु हळु बाहेर येउ लागले.मध्य प्रदेशातील काहि व्हिसल ब्लोअर नी हळु हळु या प्रकरणातील एक ,एक धागे -दोरे बाहेर आणले.तर आता त्याचाच जीव धोक्यात येउ पहातोय कारण यात आतापर्यत 1नव्हे ,2नव्हे तर तब्बल 45हुन जास्त जणाना आपला जीव गमवावा लागला आहे.मग तो राज्यपालांचा मुलगा असेना नाहितर वैद्यकिय महाविद्यालयाचे डिन ,पोलिस ,पत्रकार ,विद्यार्थी कोणीहि यातुन सुटु शकले नाहित.यातील साधारणपणे 15जाणांचा म्रुत्यु हा संशयास्पद आहे ,
यात आतापर्यत 1800हुन अधिक जणाना अटक करण्यात आली आहे.ईतके भयाण वास्तव समोर असताना राज्याचे ग्रुह मंत्री बाबुलाल ,"जो जन्माला येतो ,तो एकदा ना एकदा मरणारच "अशी वाचाळगिरी करताना दिसत आहेत.मरणारी प्रत्येक व्यक्ती जरी व्यापम शी सम्बधित नसली तरीव्यापम शी सम्बधित असणार्याचे असे संशयास्पद होणारे म्रुत्यु ची वाढणारी आकडेवारी दुर्लक्षित करुन चालणार नाहि.
सलग 3दा बहुमताच्या जोरावर मध्य प्रदेश मध्ये भाजपा सरकार आहे.भाजपा सरकारचे काम SIT (Special Investigation Team )नेमुन झाले का? SIT नेमली कि त्याची जबाबदारी सम्पते का ?कारण हि SIT शेवटि सरकारच्या खालीच काम करणार आहे.पारदर्शी कारभारची ग्वाहि देणारे भाजप सरकार चा CBI चौकशीस का विरोध होता?पण जनमताच्या रेट्यापुढे त्यानी माघार घेउन त्यानी CBI चौकशी ची मागणी केली.भाजपाला या उशीरा सुचलेल्या शहाणपणाचे 'देर आये ,दुरुस्त आये 'म्हणुन स्वागत करावे लागेल.
एकिकडे जगात भारतातील वैद्यकिय ,अभियांत्रिकि च्या विद्यार्थाना मागणी वाढत असतानाच दुसरीकडे व्यापम सारख्या प्रकरणामुळे भविश्यात आपल्या विद्यार्थीच्या गुणवत्तेबाबत शंका घेतली जाउ शकते.त्यात हुशार ,गुणवान विद्यार्थीची अवस्था 'गव्हा बरोबर किडे रगडल्या प्रमाणे होइल ' . 'स्किल इंडिया 'अशी घोषणा देणारे मोदि विद्यार्थीच्या स्किल शी सम्बधित प्रकरणात मात्र "मौनि बाबा " झालेत.
परदे के पिछे क्या है ?
शुक्रवारी माझे काम संपवुन मी घरी परतण्याच्या बेतात बस थांब्या ला उभा होतो. अचानक 'प्रिया' हि माझी एक जुनी मैत्रिण मला हाक मारू लागली,मला काहिच समजेना कारण तिने चेहर्याला "स्कार्फ" बांधला होता .मी हि काहीश्या अनोळखी भावमुद्रेने तिला न्याहाळत होतो ,बहुतेक तिला समजले आणि स्कार्फ काढला,मगच मी तिला ओळखले . नंतर गप्पा-टप्पा झाल्या ती निघूनही गेली पण इस "परदेके पिछे क्या है ?" हा विचार माझ्या मनात घोळत राहिला.तेव्हापासून "स्कार्फ''हा माझ्या संशोधनाचा किंबहुना कुतुहलाचा विषय झाला . मी रोज येता-जाताना ,बस मध्ये ,अवती -भोवती ,विविध रंगानी नटलेले ,नक्षीदार स्कार्फ न्याहाळू लागलो . नंतर माझ्या मोजणीत मला असे आढळुन आले की ,सर्वसाधारण पणे प्रत्येक १०महिलांमागे ७महिला स्कार्फ वापरतात . त्यातही वय ,शिक्षणानुसार भिन्नता आढळते . सुशिक्षित ,कॉलेज तरुणी मध्ये हेच प्रमाण वाढल्याचे दिसते.स्कार्फ वापरण्याच्या कारणाची मीमांसा केल्यास धुळ ,धुप ,प्रदूषण यापासून बचाव हेच कारण प्रामुख्याने आढळते.