Sunday, 28 June 2015

परदे के पिछे क्या है ?

            परदे के पिछे क्या है  ?
       शुक्रवारी माझे काम संपवुन मी घरी परतण्याच्या बेतात बस थांब्या ला उभा होतो.  अचानक 'प्रिया' हि माझी  एक जुनी मैत्रिण मला हाक मारू लागली,मला काहिच समजेना कारण तिने चेहर्याला "स्कार्फ" बांधला होता .मी हि काहीश्या अनोळखी भावमुद्रेने तिला न्याहाळत होतो ,बहुतेक तिला समजले आणि स्कार्फ काढला,मगच मी तिला ओळखले . नंतर गप्पा-टप्पा झाल्या ती निघूनही गेली पण इस "परदेके पिछे क्या है ?" हा विचार माझ्या मनात घोळत राहिला. 
                                तेव्हापासून "स्कार्फ''हा माझ्या संशोधनाचा किंबहुना कुतुहलाचा विषय झाला . मी रोज येता-जाताना ,बस मध्ये ,अवती -भोवती ,विविध रंगानी नटलेले ,नक्षीदार स्कार्फ न्याहाळू लागलो . नंतर माझ्या मोजणीत मला असे आढळुन आले की ,सर्वसाधारण पणे प्रत्येक १०महिलांमागे ७महिला स्कार्फ वापरतात . त्यातही वय ,शिक्षणानुसार भिन्नता आढळते . सुशिक्षित ,कॉलेज तरुणी मध्ये हेच प्रमाण वाढल्याचे दिसते.स्कार्फ वापरण्याच्या कारणाची मीमांसा केल्यास धुळ ,धुप ,प्रदूषण यापासून बचाव हेच कारण प्रामुख्याने आढळते.  
                                जरी हे खरे असले तरी , प्रदूषण नियंत्रणा साठी आपण काय करतो ?किती उपाय अमलात आणतो ?प्रत्येकाने स्वताच्या वाढदिवशी १च झाड लावले तरी ,भारतात १२१कोटि झाडे लावाली जातील ,याकडे आपण सहज कानाडोळा करतो अन स्कार्फ ला जवळ करतो .
                                राज्यघटनेने मुलभुत अधिकाराखाली (कलम १९ )अभिव्यक्ती स्वातंत्र लोकाना बहाल केले आहे ,त्यामुळेच स्कार्फ वर बंदी येऊ शकणे अवघड आहे . पण नाण्याची दुसरी बाजू हि विचारात घ्यावी लागेल,ती म्हणजे दहशतवादी त्याच्या अतिरेकी कारवाया पूर्णत्वास नेण्यासाठी ,कैमेरा च्या नजरेतुन सुटण्यासाठी स्कार्फ चा वापर करत आहेत. युरोपियन देशांनी फ्रान्स ,बेल्जिउम ,स्पेन नी म्हणूनच बुरखा बंदी लागु केली असतानाचनेमकी याच वेळी आपल्याकडे स्कार्फ वापरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते . आता तर पुरुष हि यात मागे राहिलेले नाहीत .                  
                                भारताने कित्येक वर्ष पारतंत्रात घालवल्याने स्वातंत्राची खरी किमत आपल्याहून कोणाला चांगली कळेल ?म्हणूनच नागरीकांच्या स्वातांत्राचां मान राखत आणि  त्यानीही सामजिक बांधिलकी जपुन ,समाजहितास बाधा होणार नाही आणि देश्द्रोहीना याचा फायदा होणार तर नाही ना याची काळजी घ्यावी . बाकि "परदे के पीछे क्या है "हे ज्याचे त्यालाच ठरवुद्या  

Wednesday, 24 June 2015

"दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा ".......

                               "दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा "......
        
           देशाच्याच नव्हे तर आता आपल्या राज्यासाच्या हि राजकारणात  'दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा ' हि म्हण रुजु  पहातेय.केंद्रिय मंत्री स्म्रुती ईराणी पासुन सुरु झालेला हा प्रवास नंतर दिल्लीतील आप चे आमदार तोमर ,महाराष्ट्रातील भा.ज.प.चे आमदार बबनराव लोणीकर मार्गे तावडे पर्यत येउन थाम्बला आहे.(पुढे काय होइल देव जाणे )
           निवडणुकीच्या वेळेस ,निवडणुक आयोगा ला दिलेल्या इतर हि माहिती बरोबर शैक्षणिक बाबीचे हि स्पष्टीकरण द्यावे लागते.दिलेल्या प्रतिद्न्यापत्रात अन वास्तवात जर काहि तफावत आढळली तर ,कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.(इथे मला जरा शंका वाटते ).पण सध्याची परिस्तिती पहाता राजकारण्यामध्ये खोटी माहिती ,प्रतिद्न्यापत्र देण्याची चढाओढ लागल्याचे आपणास दिसते.(मग ते भुजबळाचे मालमत्ता प्रकरण हि का असेना.)
           वरिल सर्व प्रकरणात 'शाह'निशा होउन शिक्षा होइल ना, होइल हा भाग वेगळा पण नैतिकतेच्या चेष्म्यातुन हे प्रकरण पाहिले असता फारसे चांगले चित्र दिसत नाहिय,कारण लोकशाहिच्या मंदिरात प्रवेश मिळवाच्या आधि याच मंदिराचे नियम धाब्यावर बसवण्याचे काम यथासांग रित्या पार पाडले जात आहे.ज्या लोकशाहि मंदिराच्या पायर्यावर नतमस्तक होउन जगातील सर्वात मोठ्या लोकशाहिचा गाडा हाकायला सुरवात करणार्या मोदिच्या स्वपक्षीयाना हि याचे भान नसावे ,ते हि सुशासनाची ग्वाहि देउन हि याचेच नवल वाटते.
             राजकीय द्वेषा च्या द्रुष्टी ने जरी दिल्ली प्रकरण घडले असले तरी ,महाराष्ट्रात भा.ज.प.ची अवस्था 'मी नाहि त्यातली अन ,कडी लाव आतली 'अशीच म्हणावी लागेल कारण ,त्यानी स्वत:च चिखलात दगड मारुन  स्वत:च्याच अंगावर चिखल उडवुन घेतला आहे.मुळात कोणताहि शैक्षणिक निकषाची परिपुर्णता मंत्री ,राजकारणी होण्यासाठी करावी लागत नसताना हि बनावट पदवी प्रमाणपत्राचा खटाटोप  हा "दोन हाणा पण ,शिकलेला म्हणा " यासाठीच  नसेल हे कशावरुन?
              दिखाउपणा करण्यातुन हे सर्व रामायण घडले असुन सुशिक्षितपणा चे बिरुद मिरवण्यातच हे धन्य मानणारे आहेत.मा.वसंतदादा पाटिल यांचे शिक्षण जरी कमी झालेले असले तरी त्यानी मिळवलेल्या द्यानाने त्याच्या शिक्षणावर मात केली.उत्तम राजकारणी होण्यासाठी नुसते शिक्षण उपयोगी नाहि तर त्याबरोबर दुरद्रुष्टी,कुशल असे नेत्रुत्व गुण हि हवेत ज्याच्या जोरावर तुम्हि देशाला ,राज्याला पुढे घेउन जाल.आणि देशापरी असणारे हे उत्तरदायित्व  तुम्हि कसे निभावता यावरच तुमचे राजकिय यशापयश अवलम्बुन असेल.