Thursday, 19 February 2015

आरोग्याची राजकीय हेळसांड

विलासराव देशमुख ,मुंडे आणि आता आर .आर .पाटिल यांचे असे अकस्मात जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारनाची कधीच भरुन न येणारि हानी झाली आहे.राजकारणरुपी समाजकाराणाचा वसा घेणार्या नेत्याना निवड्णुका ,राजकीय दौरे ,भेटी ,कार्यकर्त्या साठी चा वेळ ,पदाची जबाबदारी ,मिटिंग यातुन स्वताच्या आरोग्या कडे लक्ष देण्यास फारसा वेळ भेट्ला तर नवलच !
    त्यातुन रात्री -अपरात्रीचा प्रवास ,वेळी -अवेळी होणारे जेवण यातुन उद्भवणारे आजार आणि ते किरकोळ वाटुन त्याकडे व्यस्त कार्यक्रमामुळे होणार्या दुर्लक्ष मुळे हे आजार बळावतात परिणामी अशा घटनाना तोंड द्यावे लागते.अशा घटनेने होणारी हानी ही त्या व्यक्तीच्या कुटुम्बापुरती मर्यादीत न राहाता ती राज्याच्या जनमानसावर परीणाम करते .
     जनसेवेची व्रत पुर्ण करताना "आरोग्य हीच खरी दौलत " या उक्ती नुसार आधी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा स्वार्थ प्रत्येक राजाकार्ण्यानी साधावा ,कारण शेवटी "सर सलामत तो पगडी पचास "